सुरेश प्रभू उच्चविद्याविभूषित, सौम्य आणि संयमी, मृदुभाषी राजकारणी.
जीवेत शरद: शतम् शतम्, सुदिनं सुदिनं जन्मदिनम् ।
भवतु मंगलम् विजयीभव सर्वदा, जन्मदिनस्य हार्दिक शुभेच्छा: ।।
प्रभू हे उच्चविद्याविभूषित, संयमी, मृदुभाषी राजकारणी. मात्र, राजकारणात सर्वांत उपयोगी ठरणारा चाणाक्षपणा प्रभूंपाशी भरभरून आहे.
सुरेश प्रभाकर प्रभू (११ जुलै, इ.स. १९५३ – ) हे भारतीय जनता पक्षामधील एक राजकारणी व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये इ.स. २०१४ ते इ.स.२०१९ पर्यंत रेल्वेमंत्री होते. १९९६ ते २०१४ या कालावधीत शिवसेना पक्षाचे सदस्य राहिलेले प्रभू पूर्वीच्या राजापूर लोकसभा मतदारसंघ आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर निर्माण झालेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून १९९६ ते २००४ दरम्यान सलग चार वेळा निवडून आले. १९९९ ते २००२ दरम्यान प्रभू अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये वने आणि पर्यावरण, खते आणि रसायन, ऊर्जा, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग इत्यादी अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते.
मुंबई विद्यापीठामधून चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळवणारे प्रभू राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी सारस्वत बँकेच्या चेअरमनपदावर होते. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी प्रभूंना शिवसेनेत आणले व राजापूर मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट दिले. राजापूरमधून प्रभू सलग ४ वेळा लोकसभेवर निवडून आले. खासदार असताना १९९८ ते २००२ या काळात प्रभू ह्यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची मंत्रिपदे सांभाळली. परंतु २००२ साली अंतर्गत बेबनावामुळे ठाकरे ह्यांनी प्रभूंना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु तरी सुद्धा ते केंद्रात रेल्वेमंत्री होते हे विशेष.
९ नोव्हेंबर २०१४ रोजी मोदींच्या मंत्रिमंडळात नियुक्ती होण्यापूर्वी प्रभूंनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
सुरेश प्रभु हे निष्कलंक राजकारण्यांपैकी एक आहेत त्यांच वैयक्तिक आयुष्य एकदम साधं आहे राहणीमान व एकंदर स्टाईल साधीच आहे.
ते सध्याच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे माजी खासदार आहेत.
त्यांच्या खासदारकीच्या काळात अनेक गावांत रस्ते पोहचवण्याचं काम केले. आजही त्यांच्या मतदारसंघात त्यांना मानाचं स्थान आहे.
शिक्षण
सुरेश प्रभू यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या दादर भागातील शारदाश्रम विद्यामंदिर येथे झाले.पुढील काळात त्यांनी महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. तदनंतर त्यांनी रुपारेल कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. प्रभू हे सनदी लेखापाल आहेत. या परीक्षेत त्यांचा अखिल भारतात ११ वा क्रमांक आला होता. सध्या ते दोन विषयांत पीएच.डी. करीत आहेत.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा मान.आदरणीय,स्मरणीय श्री.सुरेशजी प्रभू
प्रमोद जोशी,देवगड, यांनी रचलेली एक कविता
माती घाबरे भेटाया,असे या प्रभुंचे पाणी!प्रभू आठवता गद्य,कसे होऊ लागे गाणी!
नको व्हायला चिखल, म्हणुनीच माती दूर! पाणी काचेपरी सांगे, मातीची ही हुरहूर!
यांच्या चांदण्याच्या आड, नाही आले कधी ढग! पौर्णिमाच ही निवळ, आदराने पाही जग!
हवेतही कधी यांच्या, नाही मिसळला धूर! कधी उधळले नाही, अधिकारानेही खूर!
देश असो किंवा राज्य, स्वच्छ हाताळली सत्ता! अऔध बहिऱ्या सत्तेत, उजळली नितिमत्ता!
सूर कधिही वरचा, नसतोच विसंवादी! घेई शोषून नम्रता, त्यांचा गणवेष खादी!
प्रभूपरी हेही प्रभू, वर्तने जरी स्वयंभू! गर्दीमधे ना कळते, केंद्रातील मंत्री प्रभू!
साधेपणाची तुलना, कशी बरे सांगा करू? उतू जाणाऱ्या माठात, पुन्हा कसे पाणी भरू?
प्रमोद जोशी,देवगड,