बिळवस येथील चंदू पाताडे यांना आमदार वैभव नाईक यांच्याकडून आर्थिक मदत
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे विजेचा शॉक लागून बिळवस येथील शेतकरी चंदू पाताडे यांचे तीन बैल मृत्युमुखी पडले.त्यामुळे सुमारे दोन लाखांच्या आसपास त्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी श्री. पाताडे यांना देखील विजेचा सौम्य धक्का बसला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी आज पत्नी सौ.स्नेहा वैभव नाईक यांच्यामार्फत श्री.पाताडे यांना आर्थिक मदत केली. तसेच लवकरात लवकर वीज वितरणकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी आ.वैभव नाईक यांच्या पत्नी सौ.स्नेहा नाईक, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,युवासेनेचे उपतालुकप्रमुख अमित भोगले, सिद्धेश मांजरेकर, आनंद पालव, राहूल सावंत, सचिन पालव, ज्ञानेश फणसे आदी उपस्थित होते.