माजी केंद्रीय मंत्री डॉ सुरेश प्रभू यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री नायडू यांचे वेधले लक्ष…

Made with LogoLicious Add Your Logo App

माजी केंद्रीय मंत्री डॉ सुरेश प्रभू यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री नायडू यांचे वेधले लक्ष…

 

मुंबई-सिंधुदुर्ग विमान वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री डॉ सुरेश प्रभू यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र शासनाने घोषित केला होता. पर्यटन जिल्हा म्हणून जिल्ह्यामध्ये विमानतळ कार्यान्वित केले होते. सद्यस्थितीत मुंबई सिंधुदुर्ग मुंबई अशी विमान वाहतूक सेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली आहे. यामुळे दिवाळीच्या सुटी मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पर्यटनाच्या व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ सुरेश प्रभू यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवडणुकीनंतर महाराष्ट्र शासनाशी बोलून समन्वय घडवून आवश्यक ती सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. विमान सेवा सुरळीत करण्यासाठी ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश व त्याची माहिती घेतली असून त्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे असे केंद्रीय मंत्री किंजरापू राजमोहन नायडू यांनी फोनवर डॉ सुरेश प्रभू यांना दिली. उडान योजनेमध्ये हा विमानतळ असल्यामुळे याच्या सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे असे डॉ सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशा अंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत असून, सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला असल्याने या ठिकाणी विमान वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे आवश्यकच आहे. यामुळे देशभरातील पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यास मोठे सहाय्य होणार आहे. मुंबई- सिंधुदुर्ग ही विमान वाहतूक सेवा आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आवश्यक असून मोठ्या प्रमाणात पर्यटक मुंबईवरून या ठिकाणी येत असल्याने ही सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर रत्नागिरी मध्ये होत असलेल्या विमानतळाबाबतही चर्चा करून या संदर्भात आवश्यक असणारा समन्वय साधण्याची सूचनाही डॉ प्रभू यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here