केरळीयांना जमीनी विकणाऱ्या कोकणी भुमीपुत्रां मध्ये जागृती करणारे डॉ. संजीव लिंगवत यांचा निपाणी येथे राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन पुरस्कार विजेते नामदेव चौगुले यांच्या हस्ते निपाणी येथे सत्कार….. 

केरळीयांना जमीनी विकणाऱ्या कोकणी भुमीपुत्रां मध्ये जागृती करणारे डॉ. संजीव लिंगवत यांचा निपाणी येथे राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन पुरस्कार विजेते नामदेव चौगुले यांच्या हस्ते निपाणी येथे सत्कार…..

कोकणात गावागावांतील जमिनी प्रचंड प्रमाणात मातीमोलाने केरळयन, पर राज्यातील उद्योजक यांना विकल्या जात असुन शेती व जमीन गेल्यामुळे कोकणातील भुमीपुत्र दिवसेंदिवस बेरोजगार होत आहे. कोकणातील अश्या प्रकारे विकल्या जाणाऱ्या जमीनीना डॉ. संजीव लिंगवत यांनी आपल्या गावापासून सुरूवात करून भुमीपुत्रां मध्ये जागृती निर्माण कली. सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे उपाध्यक्ष असलेल्या डॉ. लिंगवत यांनी दरवर्षी संघटनेच्या माध्यमातून पर्वत पुजन कार्यक्रम राबविला असुन जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दर वर्षी ते सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले पंचक्रोशीतील शेतकऱ्यां साठी कृषी मेळावा आयोजित करतात. प्रदुषण. बचाव करण्यासाठी वेंगुर्ले नगरपालिके तर्फे कॅम्प भागातील प्लॅस्टिक उठाव मोहीम सतत तीन वर्षे त्यांनी वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन व वेंगुर्ले नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पार पाडली. गराजलो रे गराजलो हि कोकणा साठी पर्यावरण व कृषी विषयक जनजागृती करणाऱ्या चळवळीचे ते सक्रिय कार्यकर्ते असुन गेली पंधरा ते वीस वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृक्ष संवर्धन व किल्ले संवर्धन, स्वच्छता या विषयावर ते काय करत आहेत. डॉ. लिंगवत यांच्या पर्यावरण व सामाजिक कामाची दखल घेऊन अलिकडेच निपाणी येथील “देवराई निर्माण करणारे राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन पुरस्कार विजेते नामदेव चौगुले…” यांच्या हस्ते शाल, श्री फळं, पुस्तके व रोपं देऊन सत्कार करण्यात आला. “सावली विकली जात नाही” आणि “झाडं लावणं सोपं पण जोपासणी करून झाडं मोठं करणं कठीण…” असं सांगणारे चौगुले सर् गेली २५ वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावरील इ लर्निग च निपाणी जिल्ह्यात शैक्षणिक काम करतं आहेत . पर्यावरण क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल सयाजी शिंदे सारख्या माणसांकडून शाबासकी मिळवणारे नामदेव चौगुले हे खरोखरच एक प्रभावी व्यक्तिमत्त्व सध्या पर्यावरण संरक्षणसाठी देवराई निर्मितीच काम हमीदवाडा, अर्जुनी, मेतके, निपाणी, यरनाळ या भागात करत आहेत. देवराई मध्ये वड, पिंपळ, उंबर सारखी अतिशय दुर्मिळ व रानटी झाडं लाऊन उभी करण्याचं महान कार्य चौगुले सर् करतात. त्या‌साठी प्रचंड प्रमाणात त्यांनी रोपं निर्मिती पण केली आहे . डॉ.प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी पण त्यांच्या कार्याची दखल घेऊन ” आम्ही आरोग्य सांभाळण्यासाठी प्रयत्न करतो तुम्ही पर्यावरण सांभाळा.” असं सांगत चौगुले सर् यांच्या मार्गदर्शनाखाली एक डिजिटल शाळा सुरू करण्याचा घाट घातला व पुर्ण केला. पर्यावरण व शैक्षणिक कामातील भरीव कामगिरी बद्दल चौगुले सर् यांना राष्ट्रीय स्तरावर बरेच पुरस्कार मिळाले असुन हे काम पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून पर्यावरण विषयक विशेष बांधिलकी ठेवल्या बद्दल आपण डॉ. लिंगवत यांचा सत्कार करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या अपुर्वा चौगुले व निपाणी विश्वकर्मा संघटनेचे सुनील सुतार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here