*दुर्ग संवर्धन कार्या बद्दल डॉ. संजीव लिंगवत यांचा पुणे येथे सत्कार…*
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा तर्फे २६ जानेवारी रोजी या वर्षी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण झाल्या बद्दल महाराष्ट्र राज्यातील ३५० किल्ल्यावर एकाच वेळी तिरंगा व भगवा ध्वज फडकविण्याचा वीश्व विक्रम केला. तसेच जागतिक वारसा नामांकनासाठी महासंघाने महाराष्ट्र राज्यातील १२ प्रतिकृती तयार करून दिल्ली येथे रवाना केल्या ज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यांचा समावेश आहे. तसेच किल्ले यांच्या जागतिक नामांकन निमित्ताने किल्यांवर गड स्वच्छता मोहिमा पण सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना व जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था यांनी राबविल्या होत्या व त्यांच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेतृत्व सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना यांनी केले होते त्या निमित्ताने या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून या गड मोहीम व गड संवर्धन सामाजिक कार्या बद्दल आशीया खंडातील सर्वात मोठे शिवरायांचे चरित्र साकारलेल्या पुणे , आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या सभागृहात, महासंघाचे वतीने कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालय महावारसा समिती सिंधुदुर्गचे सदस्य डॉ.संजीव लिंगवत यांचा मा.लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस व महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांच्या हस्ते शिवमुद्रा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघटनेचे अध्यक्ष उमेश झिरपे, एव्हरेस्ट शिखरावर शिवरायांचा पुतळा उभारण्यात यशस्वी सहभाग घेतलेले महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव, गिरिप्रेमी संघटनेचे अध्यक्ष जयंत तुळपुळे, महासंघाचे कार्यवाह राहून वारंगे उपस्थित होते. या कृतज्ञता मेळाव्यात शिवरायांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात ३५० किल्ल्यांवर किल्ले पुजन, ध्वजारोहण, किल्यांच्या जागतिक नामांकन मिळविण्यासाठी प्रयत्न केलेल्या व गड स्वच्छता मोहीम मध्ये सहभाग घेतलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक सामाजिक संस्थांना सहभाग प्रमाणपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्हा माउंटेनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत,
जनसेवा प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग चे प्रतिनिधी शुभम पडते,
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ, विजयदुर्ग चे प्रतिनिधी चंद्रकांत बिड्ये, आनंदीबाई रावराणे
महाविद्यालय, वैभववाडी चे प्रतिनिधी .श्रेयांक सुरेश पाटील व कु.संकेत विनायक पाटील.
व्यासपीठावर गौरव प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात गौरी गोळे लिमये यांनी इशस्तवन व शिवराय गौरव गीत सादर करून केले. त्या नंतर किल्ले जागतिक नामांकन, ३५० किल्ल्यांवरील पुजन, ध्वजारोहण. व किल्ले स्वच्छता मोहिमेची चित्रफीत दाखवुन महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री कार्यालय व सांस्कृतिक विभाग अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पाठवलेला संदेश प्रदशिर्त करण्यात आला. उपस्थित प्रमुख पाहुणे मा. लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस व मा. जगदीश कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे व आभारप्रदर्शन दिपाली भोसले यांनी केले. यावेळी महासंघाचे माधव फडके, समन्वयक राहुल मेश्राम, किरण देशपांडे, ऍड. रवी परांजपे, मिलिंद जोशी, अभिजित रणदिवे, संतोष कल्याणपुर, रंजन देशमुख, दत्ता फोपे आदी मान्यवर, विविध सामाजिक संघटनांने पदाधिकारी, सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते.